ONLINE TEST- 3 अकरावी भूगोल प्रकरण 3 व 4 वस्तूनिष्ठ प्रश्न
Prof Manoj Deshmukh 9421680541
रिटेल व होलसेल बुकींग साठी संपर्क
अकरावी- समर्थ भूगोल प्रात्यक्षिक वही (जर्नल) ची वैशिष्टे:
1 प्रात्यक्षिक वहीची ‘अ’ व ‘ब’ अशा दोन भागात विभागणी
2 ‘अ’ भागात विदयार्थ्यांना प्रात्यक्षिक लिखाण करणे कामी मुद्दे निहाय
जागा.
3 मुद्देसुद लिखाण व लिखाणा पेक्षा कृतीवर भर
4 प्रात्यक्षिक करणे व लिखाणासाठी ‘ब’ भागात आकृत्या व मार्गदर्शन
5 नमुना प्रश्नपत्रीका
संपर्क प्रा मनोज देशमुख.
राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज
चाळीसगाव
9421680541
9403386299
इयत्ता अकरावी – भूगोल नोट्स् – पुस्तक परिचय
लेखक : प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख
नोट्स ची वैशिष्टे
1) शिक्षक व विदयार्थ्यांसाठी उपयोगी
2) शिक्षकांसाठी वर्गात नोट्स लिखाण करुन देणे
कामी सोप्या भाषेत आवश्यक आकृत्या व नकाशासह स्पष्टीकरणास उपयोगी
3) विदयार्थ्यांसाठी स्वाध्यायापेक्षा जास्त व
सर्व प्रकारचे प्रश्न व त्यांची सोप्या भाषेत उत्तरे
4) सर्व प्रकरणांवर सर्व प्रकारचे वस्तूनिष्ठ
प्रश्नांचा समावेश
5) प्रकरणातील जरा विचार करा, करुन पहा, जरा डोके
चालवा, शोधा पाहू, थोडे आठवूया अशा घटकांच्या बाबतीतही मार्गदर्शन
6) प्रश्नपत्रिका आराखडयानुसार स्वध्यायापेक्षा
जास्तीचे प्रश्न-उत्तरे
7) प्रत्येक प्रकरणावर नोट्स व प्रश्न-उत्तरे अशा
दोन विभागात रचना
8) आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे यांचा समावेश
9) पाठय पुस्तकाबाहेरील नमुना उतारे
10) नमुना प्रश्नपत्रिका (घटक चाचणी,
सहामाही, वार्षिक
)
11) तज्ञ व
अनुभवी भूगोल शिक्षकांकडून नोट्स चे परिक्षण
12) आवश्यकेते नुसार आकृत्या व नकाशांचा समावेश
13) पोस्ट पार्सल / कुरीयर सेवा / एस टी
पार्सल व्दारे पुस्तक पाठविण्याची व्यवस्था
14) रिटेल व होलसेल बुकींग 14 जानेवारी पासुन सुरु
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
संपर्क:
लेखक : प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख
राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज,
चाळीसगाव
जि.जळगाव
9403386299,
9421680541
---------------------------------------------------------------------------------------------------------------
किंमत: रु. 130 + पोस्टेज + कुरियर
पैसे गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंग ने पाठवावेत.
गुगल पे, फोन पे नंबर: 9403386299
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्वालामुखी
ज्वालामुखी- सर्वसामान्य पणे बाह्य प्रावरणातून वायूरुप, द्रवरुप लाव्हा आणि घनरुप पदार्थ हे उद्रेकाच्या स्वरुपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात.
ज्वालामुखीचे वर्गीकरण-
1 उद्रेकानुसार- I) केंद्रीय उद्रेक
II) भेगीय उद्रेक
2 कालावधी व सातत्य यावरुन-
I) जागृत ज्वालामुखी, (जपान- फुजियामा, भूमध्यसागरातील स्ट्राँम्बोली)
II) निद्रिस्त ज्वालामुखी,
(इटली-व्हिस्यूव्हियस, अलास्का- काटमाई)
III) सुप्त किंवा मृत ज्वालामुखी- (आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो)
●ज्वालामुखीच्या
उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ-
A) द्रवरुप पदार्थ- यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रवरुप पदर्थांचा समावेश असतो. यास भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात मॅग्मा व भूपृष्ठावर आल्यानंतर लाव्हा असे म्हणतात. द्रवरुप पदर्थांचे सिलीकांच्या असलेल्या प्रमाणावरुन दोन प्रकार पडतात.
i) आम्ल लाव्हा- यामध्ये सिलीकांचे प्रमाण जास्त असल्याने वितलन बिंदु उच्च असतो. हा असल्याने त्यांचे वहन संथ गतीने होते.
ii) अल्कली लाव्हा- या
मध्ये सिलीकांचे प्रमाण कमी असल्याने वितलन बिंदु कमी असतो. हा पातळ असल्याने तो
जास्त प्रवाही असतो.
B) घनरुप पदार्थ- धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यात समावेश
असतो. त्यांच्यातही खालील प्रमाणे गट करता येतात. यांच्या आकारावरुन व उद्रेकावरुन
धुलीकण व खडकांच्या या एकत्रीत समुहास पुढील संज्ञा वापरल्या जातात.
|
|
ज्वालामुखीय धूळ |
उद्रेकाच्या वेळी धुलीकण व आणि खडकांचे तुकडे
अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यांना ज्वालामुखीय धूळ म्हणतात. |
राख |
उद्रेकाच्या वेळी धुलीकण, खडकांचे लहान आकाराचे
तुकडे अशा घनरुप पदार्थांना राख म्हणतात. |
सकोणाश्म |
उद्रेकाच्या
वेळी धुलीकण व खडक हे घनरुप पदार्थ जेव्हा टोकदार असतात तेव्हा त्यांना ‘सकोणाश्म’ म्हणतात. |
ज्वालामुखीबॉम्ब |
काही वेळा घनरुप लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये
लहान तुकडयांच्या स्वरुपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो त्यास ‘ज्वालामुखीय
बॉम्ब’ म्हणतात. |
C) वायुरुप पदार्थ- उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या
वर धुराचे गडद ढग दिसुन येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरुन त्यास ‘फुलकोबी ढग’
म्हणतात. यामधील काही वायु ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण
होतात.
●ज्वालामुखीय भूरुपे-
1) लाव्हा घुमट- ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन
तेथेच घनरुप बनतो. त्यावेळी तेथेच घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. मॅग्माचा
प्रवाहीपणा अशा घुमटांचे आकार ठरवतो.
* तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकडयांची निर्मिती
आम्ल लाव्हारसापासून होते.
* कमी उंचीचे विस्तृततळ असलेले घुमट अल्कली
लाव्हापासून तयार होतात.
2) लाव्हा पठारे- भेगीय ज्वालामुखीतून मोठया प्रमाणात
विस्तृत भूपृष्ठावर पसरणाऱ्या लाव्हारसापासून लाव्हा पठारांची उत्पत्ती होते. उदा.
भारतातील दख्खनचे पठार
3) ज्वालामुखीय
काहील (कॅल्डेरा) / ज्वालामुखीय विवर- ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी
काहीवेळा खूप मोठया प्रमाणावर पदार्थ बाहेर पडत असतांना त्याचवेळी खूप मोठया
प्रमाणात दाबमुक्ती होते अशा वेळी उद्रेकानंतर या भागात मोठया आकाराचे व खोल खळगे
तयार होते त्यास ज्वालामुखीय काहील (कॅल्डेरा) म्हणतात. कालांतराने येथे पाणी साचून
सरोवरांचीही निर्मिती होते.
*अशाच
लहान आकाराच्या काहीलांना ज्वालामुखीय विवर म्हणतात
4)विवर सरोवर-.ज्या
ज्वालामुखीचा एका उद्रेकानंतर, पुन्हा दीर्घकाळ उद्रेक झालेला नसतो त्याला मृत
ज्वालामुखी असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय काहील
निर्माण झालेला असतो त्या काहील / खड्डयामध्ये पावसाचे पाणी भरले जाते त्यामुळे मृतज्वालामुखी
मध्ये विवर सरोवराची निर्मिती होते
5) ज्वालामुखीय खुंटा- ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी
तेथे ज्वालामुखीय खुंटा या भूरुपांची निर्मिती होते
6) खंगारक शंकू- ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठया
प्रमाणात बाहेर पडणारे घनरुप पदार्थ, राख, अर्धवट जळालेले पदार्थ व सकोणाश्म यांना
खंगारक म्हणतात. या खंगारकाच्या संचयनातून तयार झालेल्या शंक्वाकृती टेकडी
ला खंगारक शंकू म्हणतात. उदा. इटलीतील नुओवो पर्वत
7) समिश्र
शंकू-
लाव्हारस व अर्धवट जळालेले पदार्थ अशा दोन वेगवेगळया पदार्थांच्या एकावर एक तयार
झालेल्या स्तरांमुळे तयार झालेल्या शंकुला संमिश्र शंकू म्हणतात. या प्रक्रियेत
दोन वेगवेगळया पदार्थांपासून शंकू तयार झालेला असतो म्हणून याला समिश्र शंकू
म्हणतात
भूकंप प्रक्रीया, भूकंप छायेचा प्रदेश, मर्केली व रिश्टर प्रमाण, भूकंप निर्मितीची कारणे व भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण
शीघ्रहालचाली- दोन प्रकार पडतात.
① भूकंप ② ज्वालामुखी
1) भूकंप
अंतर्गत हालचालींमुळे भूकवचातील खडकांमध्ये प्रचंड ताण
निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास, तो भूकवचातच मोकळा होतो, ताण
ज्या ठिकाणी मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात या
उर्जालहरींमुळे भूकवच कंप पावते यालाच ‘भूकंप’ म्हणतात.
# भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतरंगात सर्वच भागात पोहचत नाही. भूकंप केंद्रापासून 1050 ते 1400 च्या
दरम्यान भूकंप लहरी पोहचू शकत नाही.
●भूकंप छायेचा प्रदेश- भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंपमापन केंद्रातही भूकंपलहरींची नोंद
मिळते, असे
असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही अशा प्रदेशास भूकंपछायेचा प्रदेश म्हणतात.
i) भूकंप लहरीचे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी असे तीन प्रकार आहेत. पैकी प्राथमिक लहरी, व दुय्यम लहरी या पृथ्वींच्या अंतरंगात प्रवास करतात.
ii) प्राथमिक लहरी अंतरंगातील सर्व माध्यमातुन प्रवास करतात तर दुय्यम लहरी फक्त घनरुप माध्यमातुनच प्रवास करु शकतात.
iii) भूकंपाच्या वेळी भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 1050 अंतरापर्यंन्त दोन्ही लहरी प्रवास करीत असतात. व त्यांच्या नोंदी भूकंपमापन केंद्रात होत असतात
iv) 1050 वर द्रवरुप पदार्थाच्या सानिध्यात आल्याने प्राथमिक लहरींचे वक्रीभवन होते. तर दुय्यम लहरी द्रवरुप पदार्थात शोषल्या जातात. त्यापुढे दुय्यम लहरींची भूकंपमापन केंद्रात नोंद होत नाही.
v)वक्रीभवनामुळे प्राथमिक लहरी पुन्हा 1400 च्या पलीकडे असलेल्या भूकंपमापन केंद्रात नोंदविल्या जातात.
vi) प्राथमिक व दुय्यम या दोन्ही लहरींची अपिकेंद्रापासुन 1050 ते 1400 दरम्यानच्या प्रदेशात भूकंपमापन केंद्रात नोंद होत नाही. म्हणजेच हा प्रदेश दोन्ही लहरीसाठी भूकंपछायेचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो.
vii) भूकंपकेंद्राच्या 1400 च्या पुढे फक्त प्राथमिक लहरींची नोंद होते. मात्र 1050 च्या पुढे दुय्यम लहरींची नोंद होत नाही. म्हणजेच प्राथमिक लहरीं पेक्षा दुय्यम लहरींचा भूकंप छायेचा प्रदेशाचा विस्तार जास्त असतो
# भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो- भूपृष्ठ लहरी
(L) भूपष्ठाच्या खालुन आडव्या दिशेने प्रवास करतात. त्या पृथ्वीच्या
अंतरंगात प्रवास करीत नाही. म्हणुन त्यांची भूकंपमापीत यत्रांत नोंद होत नाही
त्यामुळे भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो असे म्हटले जाते. त्यामूळे
आकृती 1.10 मध्ये भूकंपलहरींचा प्रदेश
दर्शविलेला नाही. आकृती 1.10 मध्ये ‘अ’ हा
बिंदूवर प्राथमिक व दुय्यम लहरी पोहचू
शकतात. तर ‘ब’ बिंदू भूकंप केंद्रापासून 1050
ते 1400 च्या दरम्यान
असल्याने तो भूकंपछायेच्या प्रदेशात येतो. तसेच ‘क’ बिंदू हा भूकंप केंद्राच्या
1400 च्या पुढील भागात येत असल्याने तेथे फक्त प्राथमिक लहरी पोहचतील.
● भूकंपाची तीव्रता / महत्ता –
मर्केली प्रमाण |
रिश्टर प्रमाण |
1) मर्केली प्रमाण हे भूकंपांची तीव्रता दर्शविते. |
1) रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता (Magnitude) / उत्सर्जित होणारी
ऊर्जा दर्शविते |
2) मर्केली परिमाण हे रेषीय आहे. |
2) रिश्टर परिमाण लागीय मापन श्रेणीत असते |
3) मर्केली प्रमाणाचे मापन तंत्र हे निरीक्षण आहे |
3) रिश्टरप्रमाणाचे मापन यंत्राव्दारे होते |
4) या प्रमाणाव्दारे भूपृष्ठ, मानव निर्मित घटक व वास्तू यांवर होणाऱ्या परिणामांचे
संख्यात्मक निरीक्षण केले जाते |
4) या प्रमाणाव्दारे भूकंप लहरींतील ऊर्जेचे लागीय मापन केले जाते |
5) या प्रमाणात तीव्रता I ते XII या
एककात मोजली जाते |
5) या प्रमाणात तीव्रता 2.0 ते 10.0 या एककात मोजली जाते |
● भूकंप निर्मितीची
कारणे- भूकंपाची निर्मिती
प्रामुख्याने भूकवचातील उर्जा मुक्त झाल्यामुळे होते. उर्जामुक्तीची / भूकंपाची
कारणे पुढील प्रमाणे.
B) भूविवर्तनकी हालचाल- बाह्य
प्रावणावरील जास्त घनतेच्या भागावर लहान मोठे भूपट्ट तरंगत असुन ते स्थिर नाही.
दोन वेगवेगळया आकाराच्या जवळच्या भूपट्टांच्या सिमावर्ती भागातील हालचालींमुळे
घर्षण होऊन भूकंप होतो. (भूपट्टांच्या हालचाली म्हणजे- भूपट्टसरकणे, एकमेंकावर आदळणे, एक-दुसऱ्याखाली
जाणे) उदा.
भारतातील उत्तर काशी व आसाम मधील भूकंप प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे भारतातील
हिमालय पर्वताचा भाग अस्थिर आहे. हिमालयीन भूकंप क्षेत्र भूकंपप्रवण प्रदेश आहे.
येथे भूकंपाची संवेदना जास्त आहे. म्हणूनच हिमालय पर्वतातील लोक भूकंपाला अधिक
संवेदनशील आहेत उदा. इंडोनेशिया, चिली मधील भूकंप
C) मानव निर्मित भूकंप- आण्विक
स्फोट, मोठया प्रमाणावरील खोदकाम, सुरुगांचा वापर, अणु-चाचण्या, बांधकामे व खाणकाम
या मानवी क्रियांमुळे देखील भुकंपाची निर्मिती होते. परंतु त्यांचे परिणाम स्थानिक
असतात.
भारतातील
भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण-
प्रदेश |
जोखमीची
पातळी |
केंद्रशासित
प्रदेश /राज्य |
|
1 |
अतिशय कमी |
मध्य कर्नाटक, मध्य महाराष्ट्र इ. |
राज्यांची
किंवा ठिकाणांची यादी वाढविता येईल. |
2 |
कमी |
पुर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, MP
इ. |
|
3 |
मध्यम |
मध्य राज्स्थान पश्चिम महाराष्ट्र, केरळ, गोवा,
इ. |
|
4 |
उच्च |
उत्तराखंड, बिहार, जम्मु कश्मीर, दिल्ली, सिक्कीम
इ. |
|
5 |
अति उच्च् |
अंदमान निकोबार बेटे, आसाम, पश्चिम गुजरात,
मणिपुर इ. |