Blogger

Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स्

इयत्ता अकरावी – समर्थ भूगोल नोट्स् लेखक: प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख – विक्रीसाठी उपलब्ध -किंमत: रु. 130 + पोस्टेज / कुरियर रु. 60 = एकूण: रु. 190 Cell No. 9403386299


बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल विक्रीसाठी उपलब्ध. विद्यार्थ्यांसाठी ४०% सवलीत उपलब्ध: संपर्क: Prof. Manoj Deshmukh from R.Jr.College, Chalisgaon Dist.Jalgaon Cell No. 9421680541


Tuesday 31 December 2019

प्रात्याक्षिक क्र 5,6,7 एकत्रित नकाशा क्र 47 E/6 अहमदनगर जिल्हा


प्रात्याक्षिक क्र 5  (नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6- भूउठाव

प्रस्तुत नकाशा हा डोंगराळ प्रदेशाचा आहे. व या नकाशातील सर्वात उंच ठिकाण 608 मीटर उंचीचे असुन ते नकाशाच्या नैऋत्यदिशेला ए-3 संदर्भ चौकोनात आहे. तर सी-1 चौकानात 581 मिटर उंचीचे ‍ठिकाण आहे. नकाशातील प्रदेशाची उंची 80 मीटर ते 650 मीटर च्या दरम्यान आहे. कमीत कमी उंची ही  ए-3 या संदर्भ चौकोनात आहे.  या नकाशा प्रदेशात पूर्वेच्या तुलनेत पश्चीमेची उंची कमी आहे म्हणजेच प्रदेशात उतार हा पर्वेकडून पश्चीमेकडे आहे. नदया/नाले ही पूर्वेकडून पश्चीमेकडे वाहत आहे. तसेच अग्नेय कोपऱ्यातील प्रदेशाची उंची दक्षिणेकडे कमी होत आहे. त्यामूळे सी -3 या संदर्भ चौकानात दिसत असलेल्या नदया/नाले दक्षिणेकडे वाहत आहेत असे म्हणता येईल. नकाशात दिसत असलेले गिरी शिखराकडील समोच्च रेषा जवळ जवळ असल्याने त्या तीव्र उतार दर्शवितात. तर नकाशातदिसणारा सखल भागात समोच्चता रेषा या ऐकमेकांपासून लांब अंतरावर आहेत. नकाशात 512 मी, 504 ते 508 मी. उचीं दर्शक आकडे दिसत असुन सदर भाग हा पेलंजी पठाराचा आहे ते सी-1 या संदर्भ चौकोनात आहे. याच संदर्भ चौकोनात खडकाळ स्वरुपाची जमीन दिसत आहे.

(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत आहेत. याठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली  दिसतात.
       वैतरणा नदी नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी  तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ येवुनमिळतांना दिसत आहेत.
       तानसा नदीस बी-2 या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण बांधलेले आहे. अहमदनगर जिल्हा

(प्रात्याक्षिक क्र 7 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ नैसर्गिक वनस्पती जिवन
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून येथे विस्तृत जंगले आढळतात. ते राखीव व खुल्या जंगलांच्या प्रकारात समावेश होतो. जास्त उंचीच्या भागात दाट ते जास्त दाट जंगले आहेत. ए-1, ए-2, ए-3 या संदर्भ चौकोनात मिश्र वने आहेत. नकाशाच्या नैऋत्य भागातही मिश्र वने आहेत. नकाशातील डोंगररांगाच्या दरम्यानच्या सखल भगात अनेक ठिकाणी विखुरलेले वृक्ष व खुरटया वनस्पती आढळतात. नकाशाचाजास्तीत जास्त भाग डोंगराळ असल्याने  लागवडी खालील क्षेत्र फारसे आढळत नाहीत. ए-1 व ए-2 या संदर्भ चौकोनात साग वृक्षाचे वनीकरण केलेले आढळते. तर सी-1 व सी-2  संदर्भ चौकोनात खुली अरण्ये दिसत आहेत.


प्रात्याक्षिक क्र 6 स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली


(प्रात्याक्षिक क्र 6 नकाशा क्र- 2) स्थलनिर्देशक नकाशा क्र 47 E/6‍ जलप्रणाली
अहमदनगर 
       नकाशा प्रदेश डोंगराळ असून प्रस्तृत नकाशात जलाशये निळया रंगाने दर्शविलेले आढळतात. या नकाशातील जलप्रणाली वृक्षाकार असुन या नकाशात वैतरणा व तानसा या दोन प्रमुख नदया आढळून येत आहेत. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने अनेक जलविभाजक आढळतात. डोंगररांगा मुळे प्रमुख दोन्ही नदया वैतरणा व तानसा या दोन्ही नदयांची खोरी वेगळी झालेली दिसतात.
       वैतरणा नदी नकाशाच्या ईशान्य भागातून वाहत येत अनेक वळणे घेतांना दिसत आहे. वैतारणा नदीस पूर्वेकडून भामा ही हगांमी नदी, केंगरी हंगामी नदी, उत्तरे कडून हातनी नदी  तसेच डोंगराळ भागातुन वाहत येणारे इतरही प्रवाळ येवुन मिळतांना दिसत आहेत.
       तानसा नदीस बी-2 या संदर्भ चौकोनातुन उगम पावतांना दिसत असुन ए-2 संदर्भ चौकोनातील तळवाडा ही हंगामी नदी तिला उत्तर दिशेकडून येवुन मिळते. या तानसा नदीवर तानसा बारमाही धरण बांधलेले आहे.
       या व्यतिरीक्त भातसाई, चापनाई, राखडी या ही हंगामी नदया नकाशात बी-1, सी-2 व सी-3 चौकोनात दिसत असुन त्या वळणावळणाने वाहत आहेत


Sunday 15 December 2019

अकरावी ‌व्दितीय घटक चाचणी नमुना, गुण 25


व्दितीय चाचणी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका 
इयत्ता - अकरावी
                                   विषय- भूगोल

वेळ-1.30 तास                                                             गुण-25

सूचना- 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.
3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.

प्रश्न 1 अ- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण 
करा.                                                               4

बर्फाचे वितळणे
मरियाना
जागतिक 8.5 टक्के क्षेत्र
सागरी गर्ता
समुद्र पातळीतील वाढ
पुर
सौरतापाचे परीणाम
भूखंडाची सिमा
आवर्त-प्रत्यावर्तात वाढ
खडांन्त उतार
अवकाळी पर्जन्य
11000 मीटर खोल

  
प्रश्न 1 ब- चुकीचा घटक ओळखा. 
                                                                    3
1   जागतिक तापमान वाढीचे कारणे
  )हरीत वायु उत्सर्जन ब) निर्वनीकरण क) सूर्याचे भासमान भ्रमण 
) औदयोगिकरण

2   सागरी बेटांचे प्रकार –
) खंडीय बेटे ब) ज्वालामुखीय बेटे क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली 
बेटे ) प्रवाळ बेटे

3   सागरी मैदानात आढळणारे घटक –
)ज्वालामुखीय राख  ब) खनिज तेल  क) उल्कांचे तुकडे  ) लोह

प्रश्न 2  रा.  खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन)              9
      1 भविष्यात महासागरातील काही बेटे नकाशातुन नामशेष होण्याची शक्यता आहे.
      2 सध्याच्या काळात हवामान बदल अभ्यासणे गरजेचे आहे
      3 महासागराचे तळ हे खनिजांचे आगार असतात.
      4 महासागराखाली सुध्दा भूपष्ठावरील भूरुपांप्रमाणेच भूरुपे असतात.
      5. अवर्षण आणि पुरांच्या संखेत वाढ होत आहे.

प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.                     4
      1 आकस्मीत पुर
      2‍ महासागरातील जैविक साधन संपत्ती   

                       
प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर 
          लिहा.                                                        5
      1     महासागरातील प्रदुषण मानवासाठी कसे घातक आहे यावर चर्चा करा.
      2     जागतिक तापमान वाढीचे परीणाम

Wednesday 4 December 2019

अकरावी प्रकरण-5 हवामान बदल- उचललेली पाऊले, हवामान बदल आणि भारत, स्वाध्याय


हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी उचललेली पाऊले-
1)  9 मे 1992 ला रिओ दी जनेरिओ येथील वसुंधरा परिषदेत सर्व राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार स्विकारलेला आहे.
2)  क्योटो प्रोटोकॉल या आंतररष्ट्रीय करारामध्ये सदस्य राष्टांकडून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे बाबत सहमती करण्यात आलेली आहे.
3)  ओझोन वायूचा नाश करणाऱ्या उत्पादनांचा वापर हळूहळू बंद करण्या बाबत 1987 साली मॉस्ट्रेअल करार करण्यात आला आहे.
4)  पॅरिस करारा नुसार जागतिक तापमान वाढ 1.5 अं.से मर्यादीत राखण्या बाबत ठरले आहे.

हवामान बदल आणि भारत-
      हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका विकसशिल देश, अत्यल्प विकसित देश, छोटया बेटांवरील देश यांना होत असतो. उदा.फिजी बेटांचा समूह येत्या पन्नास वर्षात समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकतात.
      स्वच्छ उर्जा व पर्यावरणाची सुरक्षितता या धोरणांचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार संवेदनशील आहे व हवामान बदलांबाबत महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे.

1 हवामान बदलाचा राष्ट्रीय कृती आराखडा(NAPCC)- भारतात सन 2008 च्या या आराखडया नुसार वेगवेगळया आठ अभियानांच्या माध्यमातुन हवामान बदल रोखणे बाबत पाऊले उचलले गेलेली आहेत.
2 हवामान बदल अनुकूल निधी- हवामान बदलामुळे बाधीत झालेल्या राज्यांना/ प्रदेशांना मदत करणे कामी नाबार्ड संस्थेस स्वतंत्र्य जबाबदारी देण्यात आलेली आहे.
3 राष्ट्रीय स्वच्छ उर्जा निधी- भारतात कोळशाच्या वापरावर कर लावून स्वच्छ उर्जा अभियानाच्या संशोधन व विकासासाठी निधी जमा केला जातो प्रकल्पाच्या खर्चासाठी 40% निधी कर्ज किंवा अनुदान दिले जाते.

हवामानाचे बदल रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल-
1 कमी अंतर पायी चालत जाणे,
2 गरजेपुरतीच खरेदी करणे,
3 उर्जा बचत करणारी उपकरणांचा वापर,
4 लाकुड, कोळसा सारख्या जैव इंधनाचा वापर कमी करणे
5 प्लॅस्टीकचा वापर थांबविणे





स्वाध्याय-
साखळी पुर्ण करा.
उत्तर-
बर्फाचे वितळणे
समुद्रपातळीत वाढ
पूर
सौरतापाचे परिणाम 
अवकाळी पाऊस
आवर्तांच्या संख्येत वाढ
हरितगृह वायू
मिथेन
शेती
जागतिक हवामान बदल
पृथ्वीवरील सरासरी तापमान
पृथ्वीवरील जीवसुष्टी

चूकीचा घटक ओळखा-
1) जागतिक तापमान वाढीची कारणे-     चूकीचा घटक- ) सूर्याचे भासमान भ्रमण्‍
2) हवामान बदलाचे मापदंड-       चूकीचा घटक  ) कमाल आणि किमान तापमानात वाढ
3) हवामान बदल अभ्यासण्याची साधने-   चूकीचा घटक  ) प्राचीन किल्ले
4) जागतिक हवामान बदल रोखण्याचे उपाय-चूकीचा घटक ) सार्वजनिक वाहतुकीस बंदी

Monday 2 December 2019

जागतिक हवामान बदल, बाबी व परीणाम, कारणे, अभ्यास साधने


हवामान बदल- जागतीक स्तरावरील हवामानाच्य आकृतीबंधात सातत्याने होणाऱ्या बदलास `हवामान बदल` असे म्हणतात. यामध्ये मोसमी वाऱ्याचा प्रवाहातील बदल, ऋतूंमधील बदल, वृक्षांच्या बहराच्या कालावधीतील बदल, पुर आणि दुष्काळाच्या वारंवारीतेत होणारी वाढ इ. चा समावेश असतो.

हवामान बदलाच्या बाबी व परीणाम-
1 पुरांची वारंवाता आणि तीव्रतेत झालेली वाढ- गेल्या काही कालावधीत पुरांच्या संख्येत व कालावधीत वाढ झालेली असल्याचे येते उदा. 2005 साली मुंबईत पर्जन्यामुळे आलेला पुर, तसेच सन 2013 मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी, भुस्खलन व पुर. जगाच्या विवीध भागात पुरांच्या विविध भागात पुरांच्या वारंवारीतेत वाढ झालेली आहे.

2 दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ- तापमानाच्या वाढीमुळे इ. स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. जागतीक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढुन सागरीभागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रीय होतात व पाण्याच्या वाफेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मीती व तीव्रतेत वाढ होते. त्यातुन चक्रीवादळे व दुष्काळ निर्माण होतात.


3 पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पन्नात बदल होणे- वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्सॉईड मुळे हवामान, कृषी, वायु व मानवी आरोग्यावर परीणाम होत आहे. वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण 350 ppm पेक्षा जास्त हे पर्यावरणास घातक आहे. तसेच त्याचा परीणाम पर्जन्यमानावर ही होते व पर्जन्यमानाचा परीणाम पीक वाढीवर होत असतो.

4 वर्षावने आणि हवामान बदल- वने ही पृथ्वीचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. रुंदपर्णी वर्षावनांच्या प्रदेशात वनस्पतींच्या अच्छादनामुळे बाप्पीभवनाचा वेग कमी होऊन नैसर्गीकरीत्या हवा शीतल राखली जाते. परंतु मोठया प्रमाणात या वनाची तोड किंवा ही वने जाळल्याने तेथील हवा उष्ण व कोरडी होऊ लागते. तसेच वने जाळल्याने तेथे कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जातो त्यामुळे वातावरणावर ताण निर्माण होतो. मोठया प्रमाणावर होणाऱ्या निर्वनीकरणामुळे पर्जन्याचा आकृतीबंध व पर्जन्याच्या प्रमाणात बदल झालेला आहे.

हवामान बदलाची नैसर्गिक कारणे-

1 सौरउर्जा- सुर्यापासून मिळणारी उर्जा ही सर्वत्र व सर्वकाळ सारखी नसते. सौरउर्जा ही तापमानावर परीणाम करीत असते त्यामुळे त्याचा परीणाम प्रत्यक्ष हवामानावरही होत असतो.

2‍ पृथ्वीचे सुर्यापासुनचे अंतर (मिलन्कोव्हीच थेरी)- यानुसार सुर्याचे पृथ्वीपासून चे अंतर कमी होते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात वाढ होणे तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर वाढणे तेव्हा पृथ्वीचे तापमान कमी होते.  जेव्हा पृथ्वी सुर्यापासून दूर जाते तेव्हा पृथ्वीवर हिमयुग येण्याची शक्यता जास्त असते.

3 ज्वालामुखीय उद्रेक- ज्वालामुखीच्या उद्रेकातुन वातावरणात अनेक वायु बाहेर पडत असतात त्यात सल्फर डायऑक्साईड ही असतो. हे वायु बऱाच काळापर्यंन्त वातावरणात टिकुन राहतात त्यामुळे बऱ्याच वेळा हे वायु वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लांबपर्यन्त पसरतात. बऱ्याच वेळा या वायुमुळे ‍पृथ्वीवर सौरताप कमी पोहचतो. मागील दोन शतकात तसेच सन 1982 (एल सिऑन) व सन 1991 (पिंटाबू) मध्ये झालेल्या मोठया ज्वालामुखी उद्रेकांमुळे  सार्वात कमी तापमानांच्या वर्षांच्या नोंदी झालेल्या आहेत. तसेच काही वर्षांसाठी काही प्रमाणात तापमान घटल्याच्याही नोंदी आहेत.

4 गोल्डीलॉक विभाग- शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी ही सुर्यमालीकेतील जिवसृष्टी व वास्तव्यास योग्य अशा पट्टयात आहे. पुर्वी पृथ्वीवरील तापमान अतिथंड होते तेव्हा पृथ्वी या पट्टयात नव्हती. परंतु हा पट्टा कालानुरुप सुर्यापासुन दुर सरकत असल्याने पृथ्वी या पट्टयात आलेली आहे. या पट्टयात आल्यावर पृथ्वीवर जिवसृष्टीची निर्मीती झालेली आहे. अशा पट्टयाला शास्त्रज्ञ गोल्डीलॉक विभाग म्हणतात. गोल्डीलॉक विभाग हा सूर्यापासून दूर सरकत आहे. या पट्टयात होणाऱ्या अशा बदलामुळे पृथ्वीचे हवामान थंड किंवा ऊबदार होते.

हवामान बदलाची मानव निर्मीत कारणे-

·         जैविक इंधनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बन डायऑक्साईड उत्सर्जीत होणे
·         मोठया प्रमाणातील निर्वनीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणा वाढते.
हिमानी कालखंड- जेव्हा हिमनदयांचा विस्तार होतो तेव्हा अतिशय थंड हवामान असते त्यास हिमानी  कालखंड म्हणतात.
आंतरहिमानी कालखंड- हिमानी कालखंडात जेव्हा तापमान वाढते व हिमनदयांचीपिछेहाट होते अशा कालखंडास आंतरहिमानी कालखंड म्हणतात.

हवामान बदल अभ्यासण्याची काही साधने- (पूरा हवामान)

      प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच पूरा हवामान शास्त्र (प्राचीन हवामान) होय. मानवी मागील 140 वर्षापुर्वी पासून हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकराणांचा उपयोग करीत आहे. पंरतु त्यापुर्वी ही हवामानाचा अभ्यास केला जात होता हवामानाच्या अभ्यासाची साधने पुढील प्रमाणे सांगता येतील.

1 प्रवाळ कट्टे- प्रवाळकट्टे हे हवामानाच्या बदलांना फार संवेदनशील असतात. सागरी प्रवाळ हे कॅल्शिसम कार्बोनेटला शोषून त्यापासून प्रवाळाचे सांगाडे तयार करतात. सागरी जलाचे तापमान बदलते तेव्हा सांगाडयातील कॅल्शियम कार्बोनेटची घनता ही बदलते.
      समुद्रातील प्रवाळाची उन्हाळयातील घनता व हिवाळयातील घनता वेगळी असते. प्रवाळाच्या वर्तुळांची  वाढ ही ऋतुनुसार होत असते आणि याच वर्तुळांव्दारे पाण्याचे तापमान आणि प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे आपणास कळू शकते.

2 वृक्षखोडावरील वर्तुळे-  पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरुप वर्तुळांच्या निर्मीतीत भिन्नता जाणवते. त्याच वर्तुळांच्या बदलांचा मागोवा घेत पूरा पर्यावरणाच्या बदलांचा अभ्यास करता येतो.

3 बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने- अंटार्क्टिका व ग्रीनलँड या हिमक्षेत्रावरील पूष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. त्यात हिवाळयातील बर्फाचे थर व उन्हाळयातील बर्फाचे थर हे वेगवेगळे जाणवतात. व प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे बर्फाचे थर त्या वर्षातील हिमाबद्दल भरपुर माहिती पुरवतात.

·         पृथ्वीवरील अनेक प्रदेशांनी अधुन-मधुन आर्द्र व शुष्क कालावधी अनुभवलेला आहे. त्याची उदाहरणे खालील प्रमाणे
1 सुमारे 8000 वर्षापूर्वी राजस्थानचा प्रदेश आर्द्र व थंड होता.
2 हडप्पा संस्कृतीच्या सुमारे 4000 वर्षापूर्वी पासून शुष्कता निर्माण झाली होती.
3 भूगर्भिय काळामध्ये, सुमारे 500 ते 300 दशलक्ष वर्षापुर्वी पृथ्वी सुध्दा उबदार होती.